रविवार, २६ जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिन

 

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.

भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान २६ नोव्हेंबर .. १९४९ रोजी स्वीकारले २६ जानेवारी .. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले.

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत,नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.

अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.

राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात २१ तोफांची सलामी दिली जाते.

त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

१०या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आदर व्यक्त केला जातो.

११या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌. अनेक शाळा महाविद्यालयात या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव दिला जातो. विद्यार्थी नृत्य,भाषण,नाटक,गायन,विविध खेळ आदी मधून आपले गुण प्रदर्शन करतात.

१२प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे.

पण हा दिवस आपल्याला असाच मिळालेला नाही. या दिवसासाठी आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भगतसिंग,राजगुरू,सावरकर,नेताजी सुभाषचंद्र बोस,चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही बोटावर मोजण्याइतकीच नावे आपल्याला माहिती आहेत. पण अशी हजारो लोक आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी देहत्याग केला, पण त्यांची नावे इतिहासात कधीच आली नाही. पण म्हणून त्यांनी दिलेले बलिदान वाया जात नाही, आणि त्यांचे महत्व देखील कमी होत नाही.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन खूप उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो पण फक्त या दोन दिवसच राष्ट्रप्रेम राष्ट्रगीत ऐकल्यावर का उफाळून येते? हे राष्ट्रप्रेम असेच परस्परांमधील ऐक्य टिकवून निरंतर सगळ्यांच्या हृदयात जागृत राहू दे हेच मागणे या आकाशात फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रध्वजाकडे आहे.तेव्हाच या प्रजासत्ताक दिनाला खरा अर्थ प्राप्त होईल.

लेखिका

सुचेता जोशी गोसावी

बी एफ एफ – १

  बी एफ एफ – १   खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या . हो ...